।। Shree Shraddha Ayurved ।।

।। Shree Shraddha Ayurved ।। We provide Pure Ayurvedic medicines & Panchakarma Treatments to all kinds of Diseases. Specially tre

1st consultation 100 ₹
Follow up 50 ₹

Ayurveda Medicines cost extra (500 to 1000 ₹ for 15 days)

Panchakarma Treatments costs 500 to 1500 per day (as per Treatments)

 #जून_महिन्यात_वाढदिवस 🎂 असणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण  #आरोग्यदायी_शुभेच्छा_संदेश 💐माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे, कृपया व...
01/06/2026

#जून_महिन्यात_वाढदिवस 🎂 असणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण #आरोग्यदायी_शुभेच्छा_संदेश 💐
माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे, कृपया वेळ काढून शांत डोक्याने शेवटपर्यंत पूर्ण वाचा.🙏🏻

सर्वप्रथम
'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' 👨🏻‍⚕️
डॉ.उदय पाटील, (सातारा व कोरेगाव)
फोन - 88884 98732
यांचेकडून तुम्हाला
वाढदिवसाच्या आरोग्यदायी, मंगलमय शुभेच्छा❗🎂 💐

वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्याचा महत्वाचा दिवस...🥳 कारण याच दिवशी आपण या जगात आलो... बरोबर❓❌
🚫 थांबा... खरंतर आपण या जगात याआधी 9 महिने (38 ते 40 आठवडे) पूर्वीच आपल्या आईच्या पोटात🤰🏻आलोय... ✅ त्यामुळे ते आधी लक्षात घेतलं पाहिजे❗🎯

आता तुम्ही म्हणालं... एवढा कशाला त्याचा विचार करायचाय❓🤔
(शेवटपर्यंत वाचा... तुम्ही जरूर म्हणाल हे फार महत्वाचं आहे❗😃)

Birthday Celebration, केक 🎂 आणि पार्टी 🥳 तर आहेच... पण "Many Many Happy Returns of The Day" हवे असतील तर आपले आरोग्य उत्तम 💪🏻 राहिले पाहिजे... बरोबर ना❗

उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी आपण स्वतःला जाणलं पाहिजे, त्यासाठीच आयुर्वेद शास्त्रात सांगितलेप्रमाणे प्रत्येकाने स्वतःची जन्म-प्रकृती म्हणजेच आपले शरीर व मन कसे बनले आहे ते ओळखलं पाहिजे‼️

प्रत्येकाची प्रकृती ही त्या व्यक्तीच्या आई-वडिलांचे स्त्री-पुरुष बीज, मातेचे गर्भाशय, गर्भधारणा होतानाच निसर्गातील ऋतू व मातेचा आहार-विहार यामध्ये असणाऱ्या वात-पित्त-कफ दोषांच्या स्थिती नुसार ठरत असते.
(आयुर्वेद ग्रंथ संदर्भ - अष्टांग हृदय शारीरस्थान 3/82)

यातील सर्वसामान्य जनतेला आपली स्वतःची प्रकृती कोणती❓🤔
हे समजण्या साठी 1 सोप्पी ट्रिक आहे.
👇
आईच्या पोटात असताना पहिल्या 2 महिन्यात कोणता ऋतू होता❓ हे बघून त्या व्यक्तीची जन्म-प्रकृती ठरवता येते.
कसे❓ते सांगतो पुढे...

#आयुर्वेदशास्त्र पहिल्या 2 महिन्यात रस व रक्ताची 🩸 निर्मिती सांगते, जे आपल्या संपूर्ण शरीराचे पुढे आयुष्यभर पोषण करते व त्यात दोष आल्यास आपल्या शरीरात आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.

#आधुनिकशास्त्र देखील पहिल्या 2 महिन्यात अवयव निर्मिती Organogenesis सांगते. म्हणजेच आपला मूळ पाया (Base) या गर्भावस्थेच्या पहिल्या 2 महिन्यातच तयार होतो❗

🫵🏻 आता तुमचेच उदाहरण घेऊयात...
(जन्मतारीख खरी असावी, 1 जून ही अनेक जेष्ठ नागरिकांची रेकॉर्ड मध्ये लावलेली खोटी असते, तशी नसावी.)

जर तुमचा #जन्म जून महिन्यात झाला आहे म्हणजे तुमची #गर्भधारणा (भारतात महाराष्ट्रात) आईच्या पोटात 9 महिने मागे, सप्टेंबर महिन्यात शरद ऋतूमध्ये झाली असणार.

सप्टेंबर हा 🌧️ थंड पावसाळ्याचा शेवट व ऑक्टोबर मध्ये अचानक वाढणारी उष्णता, असा 2 ऋतूंच्या सांध्याचा कालावधी.
सप्टेंबर मधील पावसाचे ओलसर (आम्ल) वातावरण, मध्ये ऑक्टोबर हिट व पुन्हा 4 महिने हिवाळा असा हा विचित्र संयोग एकत्र येत असल्याने याचा परिणाम वाढणाऱ्या गर्भावर होऊन जन्माला येणाऱ्या बाळामध्ये *कफ+पित्त प्रधान अशी आम्लधर्मीच पण उष्णतेकडे झुकणारी अशी मिश्र प्रकृती* बनते.

यानुसार या लोकांची काही वैशिष्ट्ये सांगतो.... 🎯 बघा तुमच्याशी किती मॅच होताहेत...❗
(गर्भधारणा ऋतू सोबत इतर गोष्टीही परिणाम करत असतात, त्यामुळे खालील माहिती सर्वांना 100% लागू पडणार नाही कदाचित, पण आजारपणे टाळण्यासाठी नक्कीच सर्वांच्या उपयोगी आहे... Trust me❗)

#जून_मध्ये_जन्म_असणाऱ्या_लोकांची_सामान्य_शरीरवैशिष्ट्ये -👇🏻

🕺🏻 #शरीरठेवण -
जरी गर्भावस्थेचा सुरवातीचा कालावधी ऋतुबदलांचा असला तरी त्यातही बराच कालावधी थंड वातावरणात जात असल्याने या लोकांची शरीरयष्टी ही स्थूल, चरबी, जाडी जास्त असलेली राहते. लहान मुले 👶🏻 देखील दिसायला गोलमटोल दिसतात.
या लोकातही कितीही डाएट, व्यायाम 🏋🏻‍♀️ केला तरी वजन फारसे कमी होत नाही, हवा खाऊन देखील 🫃🏻चरबीच वाढते 🤦🏻‍♀️ ही मुख्य तक्रार असते❗

अगदी फार थोड्या व्यक्तींमध्ये मात्र आईवडिलांकडूनही उष्णता आल्यास किंवा स्वतःला भूक कमी असल्यामुळे भूक मारणे, उपवास, चहा ☕ जास्त, निकृष्ट आहार घेतला गेल्याने तब्बेतीने बारीक राहू शकते.

#त्वचा - गर्भकाळात दुसऱ्या महिन्यात ऑक्टोबर हिट चा परिणाम स्वरूप अनेकांची त्वचा ही कोरडी पडणारी, रुक्ष रहाते. तळपायांना भेगा असल्याची तक्रार अनेकांची असते.

👩🏻 #केस - उष्णतेमुळे या लोकांचे केस हे मध्यम स्वरूपाचे व कोरडे असतात. केस पिकणे, गळणे या तक्रारी देखील असू शकतात.

🤧 #सर्दी, कफ खोकल्याचा त्रास - बराच गर्भकाळ थंड वातावरणात असल्यामुळे थंड 🍧🍹 खाण्या-पिण्यामुळे, हवेमुळे यांना लगेच 🤧 सर्दी खोकल्याचा त्रास होतो. जून मध्ये जन्म असणाऱ्या लहान मुलांमध्येही वारंवार छातीत कफ होण्याचा त्रास असू शकतो.

#भूक - पित्ताला कफाचे साहचर्य असल्यामुळे पित्ताची उष्ण-तिक्ष्णता कमी राहते, त्यामुळे यांना मुळातच भूक कमी लागते. चहासारख्या उष्ण गोष्टी पिऊन अधिकच भूक मारली जाते व पुढे पचनाचे त्रास चालू होतात.

🤮 पित्ताचा त्रास - या लोकांना #आम्लपित्त चा त्रास मोठ्या प्रमाणात आढळून येतो. पोटात मळमळणे, आंबट गुळण्या येणे, तोंड, दात आंबणे, पित्त साठून उलट्या होणे, किंवा रोज सकाळी 🤮 उलटी करून पित्त बाहेर पाडल्याशिवाय बरे न वाटणे, सतत डोकेदुखी चा मायग्रेनचा 💆🏻‍♀️ त्रास होत असतो.

🚽 #अपचन चा त्रास (ग्रहणी / कोलायटीस / IBS) - पचनशक्ती (जठराग्नी) मंद असल्यामुळे वारंवार पोट बिघडणे, जुलाब, अपचनाची तक्रार अनेकांची असते. मल हा बांधून न होता, चिकट भसरट होणे, गॅसेस, आतड्यांना सूज येऊन कोलायटीसचा त्रास कॉमन आढळतो.

👩🏻महिलांमध्ये #मासिकपाळी अनियमित येणे हे कॉमनली दिसून येते. पचनशक्ती मंद असल्याने स्त्रीबीजाची वाढ (follicular Growth) व वेळेवर फुटणे ( ) या गोष्टी वेळेवर होत नाहीत, त्यामुळे / PCOS मासिक पाळी उशिरा 45 ते 90 दिवस, काही स्त्रियांना तर औषध घेतल्याशिवाय बीज फुटतच नाही व त्यामुळे 🤰🏻प्रेग्नन्सी राहण्यात देखील अडचणी ( ) येतात.
अंगावरून पांढरे जाणे (White Discharge) चा त्रास देखील अनेक महिलांना होताना दिसतो.

😇 #मन, स्वभाव -
सप्टेंबर च्या कमी होत चाललेल्या पावसात गर्भधारणा व पुढे ऑक्टोबर हिट यामुळे यांचे मन किंवा स्वभाव देखील 🌊 पाण्याप्रमाणे चंचल, अस्थिर, खूप हळवा, विचारांना खूप ब्रॅंचिंग असलेला परंतु या सोबतच अचानक चिडणारा तापट देखील असू शकतो.

तसेच स्वभावातील हळवेपणा, सततचे डोक्यातील विचार यामुळे त्यांना 🫩 #निद्रानाश (शांत झोप न लागणे) होतो. हेच पूढे अनेकांच्या बाबतीत मानसिक ताणास व पुढे जाऊन ब्लडप्रेशर, डायबेटीस, कोलेस्टेरॉल, थायरॉईड सारख्या अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरते. 😨

#थायरॉईड ग्रंथींचे आजार - जून मध्ये जन्म असणाऱ्या विशेषतः महिलांमध्ये हायपोथायरॉईडीजम जास्त प्रमाणात आढळते. मासिक पाळीची अनियमितता व जाडी वाढणे ही कॉमन लक्षणे असतात.

हळव्या व तापट अशी भिन्न मनोवृत्ती एकत्र असल्याने मानसिक ताण येऊन मेंदू मधूनच हॉर्मोन्सचे असंतुलन ( ) सुरू होते. पुढे जाऊन #जाडी_जास्त_व_हाडे_ठिसूळ अशी परिस्थिती अनेकांची होताना दिसते. यातून सांध्यांचे विशेषतः मान, कंबर, गुडघे, टाचा या weight bearing जॉइन्ट्स वर ताण येऊन दुखणे चालू होते. 😨
डॉक्टर 'वजन कमी करायला' सांगतात पण मूळची कफप्रधान प्रकृती असल्याने पेशंट्स ना ते खूप अवघड जाते.🤦🏻‍♂️

🎯योग्य उपचार -
ऋतुसंधीच्या वातावरणात यांची गर्भकाळातील सुरुवात झालेली असल्याने या लोकांमध्ये वेगवेगळ्या आजारांची शक्यता अधिक राहते.
यासाठी या लोकांनी आवर्जून आपल्या जवळच्या 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' चा सल्ला घ्यावा. आपल्या प्रकृतीचे योग्य निदान करून घ्यावे, पोटाची पचनक्रियेची आयुर्वेदिक पद्धतीने तपासणी करून घेऊन मंद झालेल्या अग्नीचे 🔥कार्य सुधारण्यासाठी आयुर्वेदिक औषधे, योग्य पथ्यापथ्य, योगा-व्यायाम, व गरजेनुसार पंचकर्म करून घ्यावीत.

🎯 #योग्य_आहार - आपली स्वतःची एकदा कफ-पित्ताची म्हणजेच आम्लपित्ताची जन्म-प्रकृती आहे हे कन्फर्म झाले की त्यानुसार पथ्यापथ्य समजून घेतले पाहिजे.
✅ 👉🏻 भूक मंद असल्यामुळे यांनी नेहमी ताजे, गरम, मसालेयुक्त, पचायला हलके अन्नच खावे.

याविरुद्ध थंड, आंबट, आंबवलेले (इडली, डोसा इ.) अति गोड (गुळ साखर घातलेले) पदार्थ, शिळे अन्न, बिस्कीट इ. मैद्याचे बेकरी प्रोडक्टस खाणे टाळावे.❌🚫

✅ #सुंठ हे या लोकांसाठी खूप चांगले औषध आहे. सर्दी, खोकला, कफ, आम्लपित्त, उलटी, जुलाब, आव पडणे इ. तक्रारींमध्ये सुंठ पावडर मध किंवा गरम पाण्यासोबत घेतल्यास त्वरित चांगला आराम मिळतो. 👌👍

☕ गरम चहा, आलं टाकून पिल्यावर या लोकांना छान फ्रेश वाटते. पण अतिमात्रेत चहा झाल्यास आम्लपित्त, त्वचा विकार व जाडी देखील वाढते.
यासाठी या लोकांनी साधा चहा-कॉफी न घेता आयुर्वेदिक पद्धतीचा चहा प्यावा. 👍

☕ #आयुर्वेदिकचहा (काढा) -
रात्री झोपण्यापूर्वी 2 कप पाण्यात 4 खारका व मूठभर मनुका भिजत घालाव्यात. त्यात सकाळी आले / सुंठ, लवंग, वेलची, दालचिनी, तुळस, गवती चहा टाकून हा काढा उकळावा, निम्मा आटवावा. हा काढा गाळून घेऊन त्यातील खारीक मनुका चावून खाव्या व काढा चहासारखा प्यावा.
जर उष्णतेचा त्रास असेल तर मात्र लवंग, मिरे असे उष्ण मसाल्याचे पदार्थ टाळावेत.

🎯अवेळी, पोषण मूल्ये समजून न घेता आहार घेणे ही मुख्य चूक -
2 वेळचा गोड चहा, 2 वेळचा नाष्टा व 2 वेळचे घरचे जेवण इतके अन्न देखील या लोकांमध्ये अपचनास, वजन वाढीस कारणीभूत होते. 😨

यासोबत जर चहाचे प्रमाण वाढले, बाहेरचे चमचमीत पदार्थ खाणे झाले तर पचन आणखीनच बिघडते व वजन जास्तच वाढत जाते.

👉🏻 भूक कमी, अग्नी मंद असल्यामुळे या लोकांना वजन कमी करण्यासाठी दीक्षित डाएट प्रमाणे फक्त 2 वेळी पोटभर जेवण्याचा फॉर्म्युला योग्य लागू पडतो.
यांना मी साधा गोड चहा, नाष्टा बंद ठेऊन सकाळी आयुर्वेदिक चहा (काढा) पिणे व चांगली भूक लागली की 10 ते 11 चे दरम्यान पोटभर जेवण, व संध्याकाळी लवकर 8 वाजणेपूर्वी हलका आहार (फक्त शिजवलेले मूग / मुगाची खिचडी तूप टाकून) खायला सांगतो. या लोकांना खोटी भूक सारखी लागत असेल तर त्यांनी साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या फोडणी दिलेल्या खाव्या. गोड खायची इच्छा झाल्यास खारीक (Dates) खावी. हाडांच्या मजबुतीसाठी अंड्याचा पांढरा भाग, चणे-फुटाणे, तुपात भाजलेला डिंक+खारीक पावडर मिक्स करून खावी.

🎯 #योग्य_व्यायाम -💪🏻 कफ प्रधान व्यक्तींमध्ये पचन सुधारण्यासाठी व वजन, चरबी कमी होण्यासाठी भरपूर व्यायाम करावा. सूर्यनमस्कार, जोर बैठका किंवा चांगल्या ट्रेनर च्या मार्गदर्शन खाली जिममध्ये सुद्धा 🏋🏻‍♀️ व्यायाम करून भरपूर घाम गाळायला हरकत नाही. फक्त या ट्रेनर कडून काहीही चुकीचा डाएट न घेता 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' कडून तुमच्या प्रकृतीला योग्य डाएट सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.

व्यायामानंतर भरपूर घाम येऊन त्या जागी त्वचेला फंगल इन्फेक्शन होण्याचा त्रास अनेकांना होतो, तो टाळण्यासाठी या लोकांनी व्यायामानंतर त्रिफळा चूर्ण किंवा उटणे लावून अंघोळ करावी व आंघोळीनंतर सुद्धा हे चूर्ण अंगाला कोरडे फासावे.

😇 #मनस्थिती स्वभाव स्थिर ठेवणे महत्वाचे.
या लोकांची चंचल, अस्थिर मनस्थिती, सतत विचार करणेचा स्वभाव अनेक आजारांना कारणीभूत असतो. त्यासाठी
📕 #डायरीलेखन (मनातले विचार, टेंशन्स, त्यावर सुचलेला मार्ग, नफा नुकसान, रोजचे वेळापत्रक, भविष्यातील प्लॅनिंग्ज इ. लिहावे)
🧘🏻🧘🏻‍♀️ #नामस्मरण, सोबत योगा, प्राणायाम, मेडिटेशन सारखे उपचार करणे देखील अतिआवश्यक ठरतात. 🧘🏻‍♀️🧘🏻‍♂️

तसे तर संपूर्ण निरोगीपणाचे वरदान कोणालाच मिळालेले नाही❗
पण जर आपण स्वतःची जन्म-प्रकृती म्हणजेच शरीर व मनाला नीट समजून घेतले तर मोठ्या आजारपणांपासून नक्कीच स्वतःचा बचाव करू शकतो, हे महत्वाचे लक्षात ठेवा.

आणखी एक महत्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवा... 👨🏻‍⚕️ डॉक्टर हा फक्त उत्तम मार्गदर्शक असतो व औषधे मदतीला... बाकी 'तुमचं शरीर स्वतःच स्वत:ला बरं करत असतं❗'

“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार❗” - सदगुरू 🙏🏻

तसं तरं बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण शब्दांच्या मर्यादा लक्षात घेऊन आवरतं घेतो.

मला आशा आहे कि या माहितीमुळे आता तुम्ही योग्य ती काळजी घ्याल व आजच्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या सर्व शुभेच्छा (शुभ-इच्छा) सार्थकी लागतील❗

तुमच्या कोणत्याही आरोग्याच्या तक्रारींवर मार्गदर्शनासाठी तुमचा हा ‘आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर’ तुमच्या सोबत नेहमी आहेच, आवश्यकतेनुसार जरूर संपर्क करा.
धन्यवाद 🙏🏻

आपलाच
‘आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर’
डॉ.उदय पाटील
।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।।
फॅमिली हेल्थ क्लिनिक व पंचकर्म सेंटर
कोरेगाव & सातारा
फोन - 88884 98732 & 082087 13119

यासारखी आयुर्वेदिक आरोग्यदायी माहिती नियमित मिळवण्यासाठी वरील फोन नं. वर मेसेज करा - "आयुर्वेद फॅमिली मध्ये ऍड करा❗"

31/05/2026

#नवविवाहित जोडपी किंवा पहिली / दुसरी #प्रेग्नन्सी साठी प्लॅनिंग करणाऱ्या जोडप्यांसाठी...

#शेतकरी #शेती करताना जेवढा विचार करतो तेवढा विचार तुम्ही मुलं जन्माला घालताना करताय का❓

शेतात दरवर्षी 2 - 3 पिके घेता येतात...
पण मुले आपल्याला संपूर्ण आयुष्यात आता एखाद-दुसरंच होतंय... मग जास्त काळजी कोणाची घेतली पाहिजे❓

ऐका 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' डॉ.उदय पाटील यांचे मार्गदर्शन...

“🌾शेतकऱ्यांसाठी जशी शेताची पेरणी… तशी आपल्यासाठी संततीची 👶🏻❗”पावसाळ्यात  #बीजशुद्धी व हिवाळ्यात  #गर्भधारणा... तुम्ही कध...
27/05/2026

“🌾शेतकऱ्यांसाठी जशी शेताची पेरणी… तशी आपल्यासाठी संततीची 👶🏻❗”

पावसाळ्यात #बीजशुद्धी व हिवाळ्यात #गर्भधारणा... तुम्ही कधी असा विचार केलाय का❓मुले जन्माला घालताना...

#उन्हाळा आता संपत आला आहे. काही दिवसांत #पावसाळा सुरू होईल.
शेतकरी बांधव सध्या शेतात नांगरणी, मशागत, जमीन भुसभुशीत करणे, तण काढणे, खत टाकणे अशी तयारी करत आहेत. कारण त्यांना माहिती असते —
“ #जमीन_जितकी_सुपीक_आणि_तयार_तितके_पीक_चांगले❗”

योग्य पाऊस, योग्य बीज आणि तयार जमीन मिळाली तरच भरघोस उत्पन्न मिळते.

पण एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा —
ज्या शेतासाठी आपण इतकी काळजी घेतो…
त्याचप्रमाणे #आपल्या_घरात_जन्माला_येणाऱ्या_बाळासाठी_आपण_तयारी_करतो_का❓

आजकाल बहुतेक कुटुंबांमध्ये १ किंवा २ मुलेच होतात.
शेतात पीक दरवर्षी २-३ वेळा घेता येते…
पण संततीची संधी आयुष्यात फार मर्यादित असते.

म्हणूनच संतती नियोजन म्हणजे फक्त “मुल होऊ देणे” नाही, तर
निरोगी, बुद्धिमान, मजबूत आणि संस्कारी पिढी निर्माण करण्याची तयारी आहे.

आयुर्वेद शास्त्रात हजारो वर्षांपूर्वीच सांगितले आहे की —
निरोगी गर्भासाठी आई-वडिलांचे बीज (शुक्र व अंडाणू), गर्भाशय, शरीर, मन आणि आहार शुद्ध व सक्षम असणे आवश्यक आहे.

जशी शेतकरी पेरणीपूर्वी जमीन तयार करतो,
तशीच प्रत्येक दांपत्याने गर्भधारणेपूर्वी शरीराची तयारी करणे गरजेचे आहे❗

---

🌧 #पावसाळा — #शरीरशुद्धी व #गर्भधारणा तयारीचा सर्वोत्तम काळ

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात शरीरातील दोष (विशेषतः वात दोष) वाढलेले असतात.
या काळात योग्य उपचार घेतल्यास शरीर आतून शुद्ध व सक्षम बनते.

विशेषतः खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे —
✔ शरीरातील दोषशुद्धी
✔ पचन सुधारणा
✔ स्त्रियांचे गर्भाशय निरोगी करणे
✔ मासिक पाळीतील तक्रारी कमी करणे
✔ पुरुषांमध्ये शुक्रधातू बळकट करणे
✔ मानसिक ताण, निद्रानाश कमी करणे
✔ लठ्ठपणा, थकवा, त्वचारोग, पित्तविकार नियंत्रणात आणणे

यासाठी #आयुर्वेद शास्त्रातील #पंचकर्म, #बस्ती, आहार-विहार, रसायन उपचार यांचा योग्य उपयोग होऊ शकतो.

---

#हिवाळा — 🤰🏻 #गर्भधारणेसाठी_अनुकूल_ऋतू

हिवाळ्यात शरीराची ताकद, पचनशक्ती व धातूंची गुणवत्ता नैसर्गिकरीत्या चांगली असते.
म्हणून आयुर्वेदात हा काळ गर्भधारणेसाठी अधिक अनुकूल मानला गेला आहे.

जर पावसाळ्यात योग्य तयारी केली, तर हिवाळ्यात निरोगी गर्भधारणेस मदत होऊ शकते.

---

🌾 #विशेष_आवाहन — #शेतकरी बांधवांसाठी

शेतात कोणते बीज वापरायचे, किती खत द्यायचे, जमीन कधी तयार करायची —
याचा अभ्यास करणारा शेतकरी जर स्वतःच्या पुढच्या पिढीबाबतही अशीच जागरूकता ठेवेल, तर गावोगावी अधिक निरोगी व सक्षम पिढी निर्माण होऊ शकते.

ट्रॅक्टर, बियाणे, खत यावर खर्च करतो…
पण पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी थोडा वेळ आणि नियोजन देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

---

👫 #प्रत्येक_दांपत्याने_विचार_करावा…

- अनियमित मासिक पाळी
- वारंवार #गर्भपात होणे
- उशिरा गर्भधारणा
- / #थायरॉईड / लठ्ठपणा
- पुरुषांमध्ये #वीर्यदोष किंवा शुक्राणू कमी असणे
- अशक्तपणा
- मानसिक ताण
- अपचन, आम्लपित्त
- कुटुंबात #हायब्लडप्रेशर, #डायबेटीस, हृदयरोग, कॅन्सर सारखे आजार असणे

अशा समस्या असतील तर गर्भधारणेपूर्वी शरीराची तयारी करणे अधिक आवश्यक ठरते.

---

“जशी पेरणी तशी उगवण” — हा नियम शेतालाही लागू… आणि संततीलाही.

म्हणून या पावसाळ्यात
शरीर, मन आणि बीजशुद्धीची तयारी करा…
आणि निरोगी पुढच्या पिढीसाठी आजपासूनच योग्य पाऊल उचला.

---

🌾 विशेष विनंती शेतकरी बांधवांना 🌾

ही माहिती आपल्या घरातील तरुण मुला-मुलींना, नवविवाहित जोडप्यांना आणि संतती नियोजनाचा विचार करणाऱ्या कुटुंबांना जरूर सांगा.

ज्या शेतकऱ्याला चांगल्या बियाण्याचे महत्त्व कळते…
त्याने निरोगी पुढच्या पिढीचे महत्त्वही ओळखले पाहिजे❗

म्हणून हा संदेश आपल्या परिचयातील प्रत्येक शेतकरी कुटुंबापर्यंत जरूर पोहोचवा.
कदाचित तुमच्यामुळे एखाद्या घरात निरोगी, सक्षम आणि आनंदी पिढी जन्माला येईल. 🙏
---------------------------------------
🌿 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' - डॉ.उदय पाटील 🌿
संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक मार्गदर्शन
✔ गर्भधारणेपूर्व तयारी
✔ बीजशुद्धी व गर्भसंस्कार मार्गदर्शन
✔ पंचकर्म व बस्ती उपचार
✔ स्त्रीरोग व पुरुष वंध्यत्व समस्या
✔ PCOS, थायरॉईड, लठ्ठपणा
✔ पचन, सांधेदुखी, त्वचारोग इत्यादींवर आयुर्वेदिक उपचार

📞 संपर्क :
88884 98732 & 082087 13119

🏥 क्लिनिक पत्ता -
- आझाद चौक, #कोरेगाव
- बॉम्बे रेस्टॉरंट चौक, #सातारा

आजची योग्य तयारी… उद्याची निरोगी पिढी❗🙏

अधिक सविस्तर माहिती व वैयक्तिक मार्गदर्शन साठी 88884 98732 या नंबरवर व्हाट्सअप मेसेज करा - "आम्हाला निरोगी बाळ हवंय❗"

👩🏻   आता   —  #महिलांनी_योग्य_वेळी_जागरूक_होणे_का_गरजेचे❓आजकाल अनेक महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ...
13/05/2026

👩🏻 आता — #महिलांनी_योग्य_वेळी_जागरूक_होणे_का_गरजेचे❓

आजकाल अनेक महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, केस गळणे, थकवा जाणवणे अशा तक्रारी वाढताना दिसत आहेत. तपासणीनंतर अनेकांना “PCOS” असल्याचे सांगितले जाते.

📌आता या आजाराचे नाव बदलून PMOS (Polyendocrine Metabolic Ovarian Syndrome) असे करण्यात येत आहे.

👉🏻 हा बदल फक्त नावापुरता नसून, महिलांच्या आरोग्याकडे अधिक व्यापक दृष्टीने पाहण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.

---

❇️ ्हणजे_नेमके_काय❓

पूर्वी “PCOS” या नावामुळे हा फक्त ओव्हरीमध्ये सिस्ट होण्याचा आजार आहे असा समज होता. पण प्रत्यक्षात हा विकार शरीरातील:

- हार्मोन्स,
- वजन,
- चयापचय (Metabolism),
- इन्सुलिन,
- मासिक पाळी,
- त्वचा,
- मानसिक आरोग्य

यांच्याशी संबंधित असतो.

म्हणूनच “PMOS” हे नाव अधिक योग्य मानले जात आहे.

---

❇️ #कोणती_लक्षणे_दिसू_शकतात❓

सर्व महिलांमध्ये लक्षणे सारखी असतीलच असे नाही. पण खालील त्रास वारंवार दिसून येतात:

✔ मासिक पाळी अनियमित होणे
✔ वजन वाढणे, विशेषतः पोटाभोवती चरबी वाढणे
✔ चेहऱ्यावर पिंपल्स येणे
✔ केस गळणे
✔ चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केस वाढणे
✔ थकवा, आळस
✔ गोड खाण्याची इच्छा वाढणे
✔ मानसिक ताण, चिडचिड

👉🏻 अनेक वेळा महिलांना फक्त “ #वजन वाढले आहे” किंवा “ #हॉर्मोन्सचा प्रॉब्लेम आहे” असे वाटते, पण त्यामागे PMOS असू शकतो.

---

❇️ ा_वाढत_आहे❓*

आजची बदललेली जीवनशैली हे यामागील एक मोठे कारण आहे.

- अनियमित झोप
- जंक फूड
- व्यायामाचा अभाव
- सततचा मानसिक ताण
- स्क्रीन टाइम वाढणे
- वजन वाढणे

यांचा शरीराच्या हार्मोन्सवर परिणाम होतो.

---

❇️ #वेळेवर_लक्ष_दिले_नाही_तर_पुढे_काय_होऊ_शकते❓

PMOS कडे दुर्लक्ष केल्यास पुढे:

- Diabetes
- High BP
- Obesity
- Infertility
- Fatty Liver
- Thyroid imbalance

अशा समस्या वाढण्याची शक्यता असते.

🛑म्हणून #मासिक_पाळीतील_बदल_सामान्य_म्हणून_दुर्लक्षित_करू_नयेत.🛑

---

🌿 #आयुर्वेदाचा_दृष्टिकोन_काय_सांगतो❓

आयुर्वेदानुसार प्रत्येक स्त्रीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे सर्वांना एकसारखे उपचार लागू होत नाहीत.

आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिले तर... PMOS मध्ये विशेषतः #वातदोष, त्यातील अपानवायु याचे महत्त्व अधिक दिसून येते.
- #अपानवायुचे कार्य आर्तवस्राव (मासिक पाळी), बीजोत्सर्जन आणि स्त्री प्रजनन संस्थेचे संतुलन राखणे हे आहे. अपान वायु विकृत झाल्यास पाळी अनियमित होणे, वेदना, बीजोत्सर्जनातील अडथळे दिसू शकतात.
- त्याचबरोबर #समानवायु बिघडल्यास पचन व चयापचय मंदावून वजन वाढणे व इन्सुलिन असंतुलन निर्माण होऊ शकते.
- #व्यानवायु रसरक्त संचारावर परिणाम करून त्वचेवरील पिंपल्स, केसगळती यामध्ये भूमिका बजावू शकतो, तर
- #प्राण व #उदानवायु असंतुलित झाल्यास मानसिक ताण, चिडचिड, आत्मविश्वास कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

त्यामुळे PMOS हा फक्त स्त्रीरोग नसून शरीरातील पंचवायूंच्या समतोलाशी संबंधित व्यापक विकार म्हणूनही पाहता येतो.

PMOS सारख्या अवस्थेमध्ये:

- अग्निमांद्य,
- कफ-वात दोष,
- मेदवृद्धी,
- आर्तवदुष्टी,
- चुकीचा आहार-विहार

यांचा विचार केला जातो.

🎯 फक्त पाळी सुरू करणे किंवा वजन कमी करणे एवढ्यावर उपचार मर्यादित नसून, शरीराचा समतोल सुधारण्यावर भर दिला जातो.

---

❇️ 👩🏻 #महिलांनी_काय_काळजी_घ्यावी❓

🍲 #आहार -
- 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' कडून स्वतःची #जन्मप्रकृती जाणून घेऊन त्यानुसार योग्य आहार घ्यावा.
- मैदा, बेकरी पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स कमी करावेत
- वेळेवर जेवण करावे

🧘🏻‍♀️ #व्यायाम -

- रोज चालणे
- योग, सूर्यनमस्कार
- वजन नियंत्रण

😴 #झोप -

- रात्री जागरण टाळावे
- पुरेशी झोप घ्यावी

😇 #मानसिकआरोग्य -

- ताण कमी ठेवणे
- स्क्रीन टाइम कमी करणे
- स्वतःसाठी वेळ देणे

---

👉🏻 एक महत्त्वाची गोष्ट

ा_फक्त_पाळीचा_किंवा_फक्त_गर्भधारणेचा_प्रश्न_नाही. हा संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी संबंधित विकार आहे.

योग्य वेळी निदान, जीवनशैलीतील बदल आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास यावर चांगले नियंत्रण मिळवता येते.

---

👨🏻‍⚕️ #आयुर्वेदिक_फॅमिली_डॉक्टरचा_सल्ला -

महिलांनी आपल्या शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष करू नये.
मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, पिंपल्स, केस गळणे यांसारखी लक्षणे वारंवार दिसत असल्यास वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

योग्य आहार, नियमित दिनचर्या, व्यायाम आणि वैयक्तिक प्रकृतीनुसार आयुर्वेदिक उपचार यांच्या मदतीने शरीराचा समतोल सुधारण्यास मदत होऊ शकते.

👩🏻 #निरोगी_स्त्री_म्हणजे_निरोगी_कुटुंब 👍 — आणि त्याची सुरुवात जागरूकतेपासून होते.

केस नं 2 -  #कंबरदुखी (  #सायटिका )... सक्सेसफुल केसेस...' #आयुर्वेदिकफॅमिलीडॉक्टर' चे वैशिष्ट्य पूर्ण उपचार...(फोन - 88...
12/05/2026

केस नं 2 - #कंबरदुखी ( #सायटिका )... सक्सेसफुल केसेस...
' #आयुर्वेदिकफॅमिलीडॉक्टर' चे वैशिष्ट्य पूर्ण उपचार...
(फोन - 88884 98732 & 82087 13119)

ही केस व त्याचे निदान खूप वैशिष्ट्य पूर्ण व महत्वाचे आहे... 1 सोप्पी केस कशी पेशंटने स्वतः अवघड बनवलीय❗बघा...

कोरेगाव जवळच्या गावातील माझ्या 1 लेडीज पेशंट आहेत... त्यांच्या तब्बेतीच्या तक्रारींमध्ये उपचारांनी चांगला फरक आहे, त्यामुळे माझ्या आयुर्वेदिक निदान पद्धतीवर व उपचारांवर त्यांची भरपूर श्रद्धा❗
'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' प्रमाणे त्यांचे कुटुंबीय माझ्याकडे उपचारासाठी येतात नेहमी.

त्यांचे बंधू वय 55 वर्ष, पुण्याजवळच्या शिरवळ MIDC मध्ये एका कंपनीत स्टोअर ऑपरेटर...

या त्यांच्या भावाला अचानक #कंबरदुखी व #डाव्या_पायाला_वेदना व मुंग्या येण्याचा त्रास चालू झाला... दीड वर्षापूर्वी देखील त्रास झालेला पण त्यावेळी ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून पेनकिलर, सप्लिमेंट्स इ. औषधें व फिजिओथेरपी घेऊन आराम मिळालेला, पण आता 1 महिन्यापासून पुन्हा त्रास चालू, यावेळेस मात्र औषधे, फिजिओथेरपी घेऊन पण दुखणे कमी होत नव्हते. त्यांना माझ्या पेशंटने कोरेगावला माझ्याकडे दाखवायला येण्यास सांगितले... पण तेवढ्यात दुसऱ्या कोणीतरी त्यांना छ.संभाजीनगर येथे कोणी गावठी औषधे देतो म्हणून सांगितले... झालं सध्या लोक कोणी काय सांगेल तिकडे जादूच्या अपेक्षेने उपचार घ्यायला जातात...
हा पेशंट देखील छ.संभाजीनगर ला जाऊन आला. तिथल्या उपचारांचा फायदा होण्याऐवजी प्रवासानेच कंबरदुखी जास्त वाढली...

मग माझ्या कोरेगाव च्या पेशंट त्यांना बघायला गेल्या तेंव्हा त्यांना माझ्याकडे घेऊन यायला निघाल्या... मी त्यांना स्पष्ट सांगितले की नुसतं भेटायला येऊन प्रवासाने त्रास वाढवून घेऊ नका, येणारच असाल तर किमान 8 दिवस राहायच्या, पंचकर्म उपचार करण्याच्या तयारीने या...

मग आले हे पेशंट कोरेगाव ला 15 दिवसांची सुट्टी टाकून...

आल्यानंतर सर्वप्रथम त्यांची पूर्ण केस समजून घेण्यात आली.
15 ऑगस्ट चा जन्म, म्हणजे #गर्भधारणा थंडीत 👌 #जन्मप्रकृती उत्तम. वजन 61 किलो, उंचीला साजेसं.

पण त्यांना पित्ताची जळजळ, उष्णतेने महिन्यात 2 - 3 वेळा तोंड येण्याचा त्रास होता. याला कारण होते त्यांची वारंवार #तंबाखू खाण्याची सवय.

कंबरेचा MRI बघितला तेंव्हा लक्षात आले की कंबरेच्या 2 - 3 मणक्यांमधील चकती थोड्या (Mild ) प्रमाणात सरकलेली होती. म्हणजे त्यांच्या मणक्यात खरेतर फार मोठा दोष नव्हता पण त्यांना होणारा त्रास मात्र खूप मोठ्या प्रमाणात दिसत होता. अगदी त्यांना डावा पाय कंबरेपासून उचलता देखील येत नव्हता. टेस्ट Strong Positive❗

का बरं असं असेल❓🧐 🤔

सायटिका चा त्रास होण्यात एकतर मणक्यातील चकतीचे moderate to severe प्रेशर मज्जारज्जू वर पडायला हवे किंवा... मज्जारज्जू च एवढा नाजूक झाला असेल की त्यावर पडणारे mild प्रेशर देखील सहन होत नसावे...

दुसऱ्या शब्दात आजार मोठा नव्हता पण पेशंटची सहनशक्ती कमी झालेली होती❗

काही लोकांना तलवारीचा मोठा घाव झाला तरी ते ओरडत नाहीत, पण काहींना साधी इंजेक्शन ची सुई टोचायची म्हटली तरी आकांडतांडव करतात, त्यासारखा हा प्रकार❗

मग प्रश्न... ऑगस्ट चा जन्म, शरीर धडधाकट, मग सहनशक्ती का कमी❓

📌(Important NOTE - मूळची शरीरयष्टी मजबूत असणाऱ्या लोकांच्या शरीरावर व्यसनांचा लवकर दुष्परिणाम होत नाही... पण मनावर, सहनशक्ती वर मात्र नक्की होतो❗)

अजून माहिती घेतल्यावर समजले की या पेशंट ला पूर्वी #दारूचे मोठ्ठे #व्यसन होते. अगदी तरुणपणापासूनच रोज सकाळ पासूनच दारू पिणे चालू असायचे... त्यातच त्यांची मोठी मुलगी कॅन्सर च्या आजाराने वारली, तिच्या सोबत हॉस्पिटलमध्ये असताना दारू बंद ठेवावी लागली पण त्यावेळी तंबाखू चे व्यसन लागले.

बायकोशी ही त्यांचे विशेष पटत नव्हते, घरात नेहमी वाद, रागराग, चिडचिड चालू असायची... ब्लडप्रेशर चा देखील त्रास होता, पण गोळ्या अनियमित होत्या.

माझं #निदान पक्कं होत... मणक्याचा त्रास थोडाच आहे, पण त्यांच्या मनाची, मज्जारज्जू ची ताकद, सहनशक्ती कमी झालेली होती.

मी त्यांना सांगितले की तुमच्या मणक्यातला छोटा दोष आहे तो आयुर्वेदिक औषधे, #विद्धअग्नीकर्म व 8 दिवसांच्या #पंचकर्म उपचाराने नक्की कमी होईल. पण त्यासाठी तुम्हाला तुमची व्यसने पूर्ण बंद ठेवावी लागतील. पटत असेल तरच करूयात उपचार चालू... नाहीतर नको❗

अशा वेळी पेशंट जवळ चॉईस च नसतो दुसरा काही... त्यामुळे ते तयार झाले...

आणि खरंच 8 दिवसांच्या ट्रीटमेंट ने त्यांचा त्रास हळूहळू पूर्ण कमी झाला... 🥳

विशेष म्हणजे पंचकर्म चालू झाल्यावर दुसऱ्या दिवशी पेशंटने मला सांगितले की दुखणे बरंच कमी वाटतंय, पण रात्री झोप बिलकुल लागली नाही.
कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले की आता त्यांनी #ताडी पिण्याचे देखील व्यसन चालू केले आहे... एवढे की रोज रात्री ताडी पिली नाही तर बिलकुल झोप लागत नाही.
हाईट म्हणजे घरून येताना त्यांनी कार मधून ताडी च्या बाटल्या 🍾🍾 सोबत आणल्या होत्या❗ 🤦🏻‍♂️
त्यांचं म्हणणं असं होतं की ते व्यसनाशिवाय जगूच शकत नाहीत. 🤷🏻‍♂️

👉🏻 "व्यसन सोडायला जमत नसेल तर ट्रीटमेंट आजच थांबवूयात..." असे मी सांगितले मुळे त्यांनी पुढे 8 दिवस बिलकुल ताडी पिली नाही, त्यामुळे 8 दिवस त्यांना चांगली झोप देखील लागली नाही, अगदी जागून रात्री काढल्या पण या 8 दिवसात वेदना जवळपास पूर्ण थांबल्या होत्या त्यांच्या.

8 दिवसांच्या उपचारानंतर अजून 8 दिवस सुट्टी काढून घरी आराम करा असे सांगून त्यांना त्यांच्या गावी शिरवळ ला जायला सांगितले. #व्यसन पुन्हा चालू करू नका असे स्पष्ट सांगून ठेवले होते, पण निघतानाच त्यांचा आत्मविश्वास कमजोर जाणवला. "प्रयत्न करतो... पण अवघड आहे व्यसनांपासून दूर राहणे..." हे त्यांचे बोलणे शेवटी माझ्या मनाला चटका लावून गेले❗

आणि झालेही तसेच... गेल्या दिवसापासूनच ताडी व तंबाखू खाणे चालू केले त्यांनी, 2 दिवसांनी पुन्हा दुखणे चालू झाले... 1 आठवड्याने मला फोन आला की दुखणे पुन्हा वाढले आहे, व्यसने सोडणं काही शक्य झाले नाही घरी आल्यावर... दुसरा काही उपचार असेल तर सांगा...

त्यांना असा जादूचा उपाय हवा होता की व्यसने चालू ठेवून पण त्रास बरा व्हावा...

त्यासाठी त्यांनी अगदी ऑपरेशनची सुद्धा तयारी दाखवली... पण ऑर्थोपेडिक डॉक्टर देखील म्हणत होते की या mild disc bulge ला ऑपरेशन ची गरज नाही, त्यापेक्षा फिजिओथेरपी करा.

मग पुन्हा ते जादूच्या शोधात बारामतीला फिजिओथेरपिस्ट कडे गेले... तिथे देखील तेच सांगितले गेले, व्यसने सोडा, आजार छोटा आहे, बरा होईल❗

पण पेशंटने निग्रहाने व्यसने सोडली पाहिजेत ना‼️

'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' असल्याने सर्व पेशंट्सचा फॉलोअप आम्ही नेहमी ठेवतोच❗

तुम्हाला काय वाटतंय... ही केस सक्सेस स्टोरी आहे की नाही❓
डॉक्टर म्हणून आम्ही आमचे कर्तव्य योग्य पद्धतीने केले व त्याचे रिझल्ट्स देखील सक्सेसफुल च होते, पण पेशंट्स नी आजाराचे निदान समजून घ्यायला पाहिजे ना❓ व त्यानुसार पथ्यापथ्य पण पाळले पाहिजे❗

तुम्हाला काय वाटतंय❓ जरूर कमेंट करून कळवा....

तुमच्या माहितीत अशी एखादी केस असेल तर ती देखील जरूर कळवा.

तुम्हाला किंवा तुमच्या परिचयातील कोणाला सायटिका किंवा कोणताही आजार असेल तर त्याचे योग्य निदान व गुणकारी आयुर्वेदिक उपचारांसाठी जरूर संपर्क साधा...

डॉ.उदय पाटील
' #आयुर्वेदिकफॅमिलीडॉक्टर'
कोरेगाव & सातारा.
अपॉइंटमेंट साठी फोन नं.
88884 98732 & 82087 13119
।। Shree Shraddha Ayurved ।।

09/05/2026

शास्त्रोक्त लिंबू सरबत बनवण्याची पद्धत व उपयोग
#लिंबूसरबत #उन्हाळा #आम्लपित्त #आयुर्वेद

09/05/2026

उन्हाळ्यात वजनवाढीची चिंता सतावतेय का❓
मग ऐका 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर'चा सल्ला...

- डॉ.उदय पाटील
'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर'
कोरेगाव & सातारा
फोन - 88884 98732 & 082087 13119
।। Shree Shraddha Ayurved ।।

#उन्हाळा #वजनवाढ

#आयुर्वेद #लिंबूसरबत

👨‍👩‍👧 तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक विश्वासार्ह डॉक्टर - 👉 सातारा शहरात उपलब्धआजकाल प्रत्येक घरात काही ना काही आरोग्य स...
04/05/2026

👨‍👩‍👧 तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक विश्वासार्ह डॉक्टर - 👉 सातारा शहरात उपलब्ध

आजकाल प्रत्येक घरात काही ना काही आरोग्य समस्या असतात... ज्या दीर्घकाळ चालल्या तर मोठ्या आजारात रूपांतरित होऊ शकतात.

पण योग्य मार्गदर्शन मिळाले तर आजार पूर्ण बरे होणे शक्य आहे.

🌿👨🏻‍⚕️आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर – सातारा 🌿

👉 कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपचार,
👉 अगदी प्रेग्नन्सी मध्येही आवर्जून घ्यावे असे सुरक्षित
👉 गुणकारी आणि नैसर्गिक उपाय
👉 दीर्घकालीन आरोग्य सुधारणा

कुटुंबातील कोणाच्याही कोणत्याही (अगदी सर्दी खोकल्यापासून, संधिवात, मणक्याचे आजार, डायबेटीस बीपी पर्यंत) आरोग्य समस्यांवर आयुर्वेदिक उपचार

👨‍⚕️ डॉ. उदय अ. पाटील,
पत्ता - C/O चरक आयुर्वेद शॉप
गुरुशिल्प टॉवर, बस स्टॉप समोर,
बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा

📍 OPD दिवस : मंगळ, बुध, शुक्र, शनि
⏰ वेळ : संध्याकाळी 4 PM ते 8 PM

📞 संपर्क: 88884 98732, 082087 13119

❤️ तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी – आमची❗

।। Shree Shraddha Ayurved ।।

 #मे_महिन्यात_वाढदिवस 🎂 असणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण शुभेच्छा संदेश 💐माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे, कृपया वेळ काढून शांत ...
01/05/2026

#मे_महिन्यात_वाढदिवस 🎂 असणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण शुभेच्छा संदेश 💐
माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे, कृपया वेळ काढून शांत डोक्याने शेवटपर्यंत पूर्ण वाचा.🙏🏻

सर्वप्रथम
#आयुर्वेदिक_फॅमिली_डॉक्टर 👨🏻‍⚕️
डॉ.उदय पाटील
।। Shree Shraddha Ayurved ।।
सातारा व कोरेगाव
(फोन - 88884 98732 & 082087 13119 )
यांचेकडून तुम्हाला
वाढदिवसाच्या आरोग्यदायी, मंगलमय शुभेच्छा❗🎂 💐

वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्याचा महत्वाचा दिवस...🥳 कारण याच दिवशी आपण या जगात आलो... बरोबर❓❌
🚫 थांबा... खरंतर आपण या जगात याआधी 9 महिने (38 ते 40 आठवडे) पूर्वीच आपल्या आईच्या पोटात🤰🏻आलोय...✅ त्यामुळे ते आधी लक्षात घेतलं पाहिजे❗🎯

आता तुम्ही म्हणालं... एवढा कशाला त्याचा विचार करायचाय❓🤔
(शेवटपर्यंत वाचा... तुम्ही जरूर म्हणाल हे फार महत्वाचं आहे❗😃)

Birthday Celebration, केक 🎂 आणि पार्टी 🥳 तर आहेच... पण "Many Many Happy Returns of The Day" हवे असतील तर आपले आरोग्य उत्तम 💪🏻 राहिले पाहिजे... बरोबर ना❗

उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी आपण स्वतःला जाणलं पाहिजे, त्यासाठीच आयुर्वेद शास्त्रात सांगितलेप्रमाणे प्रत्येकाने स्वतःची जन्म-प्रकृती म्हणजेच आपले शरीर व मन कसे बनले आहे ते ओळखलं पाहिजे‼️

प्रत्येकाची प्रकृती ही त्या व्यक्तीच्या आई-वडिलांचे स्त्री-पुरुष बीज, मातेचे गर्भाशय, गर्भधारणा होतानाच निसर्गातील ऋतू व तिचा आहार-विहार यामध्ये असणाऱ्या वात-पित्त-कफ दोषांच्या स्थिती नुसार ठरत असते.
( #आयुर्वेद_ग्रंथ_संदर्भ - अष्टांग हृदय शारीरस्थान 3/82)

यातील #सर्वसामान्य_लोकांनी_आपली_स्वतःची_प्रकृती_कोणती❓🤔
हे समजण्या साठी 1 सोप्पी ट्रिक आहे.
👇
आईच्या पोटात असताना पहिल्या 2 महिन्यात कोणता ऋतू होता❓ हे बघून त्या व्यक्तीची जन्म-प्रकृती ठरवता येते.
कसे❓ते सांगतो पुढे...

आयुर्वेद शास्त्र पहिल्या 2 महिन्यात रस व रक्ताची 🩸 निर्मिती सांगते, जे आपल्या संपूर्ण शरीराचे पुढे आयुष्यभर पोषण करते व त्यात दोष आल्यास आपल्या शरीरात आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.

आधुनिक शास्त्र देखील पहिल्या 2 महिन्यात अवयव निर्मिती Organogenesis सांगते. म्हणजेच आपला मूळ पाया (Base) या गर्भावस्थेच्या पहिल्या 2 महिन्यातच तयार होतो❗

🫵🏻 आता तुमचेच उदाहरण घेऊयात...
(जन्मतारीख खरी असावी, रेकॉर्ड मध्ये लावलेली खोटी नसावी.)

जर तुमचा जन्म मे महिन्यात झाला आहे म्हणजे तुमची #गर्भधारणा (भारतात महाराष्ट्रात) आईच्या पोटात 9 महिने मागे, ऑगस्ट महिन्यात झाली असणार.

ऑगस्ट, सप्टेंबर हे पहिले 2 महिने पावसाळा 🌧️⛈️. पावसाळ्यातील ओलसर (आम्ल) वातावरणाचा परिणाम वाढणाऱ्या गर्भावर होऊन जन्माला येणाऱ्या बाळामध्ये आम्लतेचे (कफ+पित्ताचे) गुणधर्म जास्त दिसून येतात.
त्यामुळे होणाऱ्या बाळाची ित्त_प्रधान (थंड) अशी आम्लधर्मी (सोप्प्या भाषेत आम्लपित्ताची) प्रकृती बनते.

यानुसार या लोकांची काही वैशिष्ट्ये सांगतो.... 🎯 बघा तुमच्याशी किती मॅच होताहेत...❗
(गर्भधारणा ऋतू सोबत इतर गोष्टीही परिणाम करत असतात, त्यामुळे खालील माहिती सर्वांना 100% लागू पडणार नाही कदाचित, पण आजारपणे टाळण्यासाठी नक्कीच सर्वांच्या उपयोगी आहे... Trust me❗)

#मे_मध्ये_जन्म_असणाऱ्या_लोकांची_सामान्य_शरीर_वैशिष्ट्ये -👇🏻

🕺🏻शरीर ठेवण - गर्भकाळातील पहिले 2 महिने पावसाळा व नंतर 4 महिने हिवाळा असे थंड वातावरण असल्यामुळे या लोकांच्या शरीरात कफप्राधान्य जास्त राहून शरीरयष्टी ही स्थूल, चरबी, जाडी जास्त असलेली राहते. लहान मुले 👶🏻 देखील दिसायला गोलमटोल दिसतात.
मोठ्यांची तर कितीही डाएट, व्यायाम 🏋🏻‍♀️ केला तरी वजन फारसे कमी होत नाही, हवा खाऊन देखील 🫃🏻चरबीच वाढते 🤦🏻‍♀️ ही मुख्य तक्रार असते❗

अगदी फार थोड्या व्यक्तींमध्ये मात्र आईवडिलांकडून उष्णता आल्यास किंवा स्वतःला भूक कमी असल्यामुळे भूक मारणे, उपवास, चहा ☕ जास्त, निकृष्ट आहार घेतला गेल्याने तब्बेतीने बारीक राहू शकते.

त्वचा - स्निग्ध, तेलकट, तुकतुकीत असते. तेलकटपणा जास्त राहून किंवा जाडीमुळे घाम जास्त येऊन या लोकांना फंगल इन्फेक्शनचा, खाज सुटणेचा त्रास असू शकतो.

👩🏻 केस - शक्यतो दाट, काळेभोर, लांबसडक असतात. बऱ्याच लोकांना विशेषतः महिलांमध्ये केसात तेलकटपणा जास्त राहून 🙆🏻‍♀️ खाज सुटणे, ओला कोंडा होण्याचा त्रास आढळतो.

🤧 सर्दी, कफ खोकल्याचा त्रास - मूळची कफप्रधान प्रकृती असल्यामुळे थंड 🍧🍹 खाण्या-पिण्यामुळे, हवेमुळे यांना लगेच 🤧 सर्दी खोकल्याचा त्रास होतो. मे मध्ये जन्म असणाऱ्या लहान मुलांमध्ये तर वारंवार छाती भरण्याचा, छातीत कफ होण्याचा त्रास असतो, अनेकदा न्यूमोनिया देखील होतो.

#भूक - पित्ताला कफाचे साहचर्य असल्यामुळे पित्ताची उष्ण-तिक्ष्णता कमी राहते, त्यामुळे यांना मुळातच भूक कमी लागते. चहासारख्या उष्ण गोष्टी पिऊन अधिकच भूक मारली जाते व पुढे पचनाचे त्रास चालू होतात.

🤮 पित्ताचा त्रास - या लोकांना #आम्लपित्त चा त्रास मोठ्या प्रमाणात आढळून येतो. पोटात मळमळणे, आंबट गुळण्या येणे, तोंड, दात आंबणे, पित्त साठून उलट्या होणे, किंवा रोज सकाळी 🤮 उलटी करून पित्त बाहेर पाडल्याशिवाय बरे न वाटणे, सतत डोकेदुखी चा मायग्रेनचा 💆🏻‍♀️ त्रास होत असतो.

🚽 अपचनाचा त्रास (ग्रहणी / कोलायटीस / IBS) - पचनशक्ती (जठराग्नी) मंद असल्यामुळे वारंवार पोट बिघडणे, जुलाब, अपचनाची तक्रार अनेकांची असते. मल हा बांधून न होता, चिकट भसरट होणे, गॅसेस, आतड्यांना सूज येऊन कोलायटीसचा त्रास कॉमन आढळतो.

👩🏻 महिलांमध्ये #मासिकपाळी_अनियमित येणे हे कॉमनली दिसून येते. पचनशक्ती मंद असल्याने स्त्रीबीजाची वाढ (follicular Growth) व वेळेवर फुटणे (Ovulation) या गोष्टी वेळेवर होत नाहीत, त्यामुळे / PCOS मासिक पाळी उशिरा 45 ते 90 दिवस, काही स्त्रियांना तर औषध घेतल्याशिवाय बीज फुटतच नाही व त्यामुळे 🤰🏻प्रेग्नन्सी राहण्यात देखील अडचणी ( ) येतात.
अंगावरून पांढरे जाणे (White Discharge) चा त्रास देखील अनेक महिलांना होताना दिसतो.

😇 मन, स्वभाव -
पावसाळ्यात गर्भधारणा होत असल्याने यांचे मन देखील 🌊 पाण्याप्रमाणे चंचल, अस्थिर, खूप हळवे, चिकटून राहणारे, स्वभाव शक्यतो कोणाला न दुखावणारा, विचारांना खूप ब्रॅंचिंग असलेला असतो.

या स्वभावामुळे हे लोक बोलायला मनमोकळे, गोड वाटतात, मित्रपरिवार मोठा असतो यांचा. व्यवसायामध्ये देखील यांची चांगली प्रगती होते. 👍 एकावेळेस अनेक कामे, व्यवसाय करू शकण्याची यांची खासियत असते, परंतु अस्थिर, चंचल स्वभाव हा त्यांच्यासाठी मोठा अडथळा ठरतो. 🤷🏻‍♂️

तसेच स्वभावातील हळवेपणा, सततचे डोक्यातील विचार यामुळे त्यांना 🫩 #निद्रानाश (शांत झोप न लागणे) होतो. हेच पूढे अनेकांच्या बाबतीत मानसिक ताणास व पुढे जाऊन ब्लडप्रेशर, डायबेटीस, कोलेस्टेरॉल, थायरॉईड सारख्या अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरते. 😨

#थायरॉईड ग्रंथींचे आजार - मे मध्ये जन्म असणाऱ्या विशेषतः महिलांमध्ये हायपोथायरॉईडीजम जास्त प्रमाणात आढळते. मासिक पाळीची अनियमितता व जाडी वाढणे ही कॉमन लक्षणे असतात.

हळव्या मनामुळे मानसिक ताण सतत घेत राहिल्याने मेंदू मधूनच हॉर्मोन्सचे असंतुलन ( ) सुरू होते. पुढे जाऊन #जाडी_जास्त_पण_हाडे_ठिसूळ अशी परिस्थिती अनेकांची होताना दिसते. यातून सांध्यांचे विशेषतः मान, कंबर, गुडघे, टाचा या weight bearing जॉइन्ट्स वर ताण येऊन दुखणे चालू होते. 😨
डॉक्टर 'वजन कमी करायला' सांगतात पण मूळची कफप्रधान प्रकृती असल्याने पेशंट्स ना ते खूप अवघड जाते.🤦🏻‍♂️

🎯 योग्य #उपचार -
यासाठी या लोकांनी आवर्जून आपल्या जवळच्या 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' चा सल्ला घ्यावा. आपल्या प्रकृतीचे योग्य निदान करून घ्यावे, पोटाची पचनक्रियेची आयुर्वेदिक पद्धतीने तपासणी करून घेऊन मंद झालेल्या अग्नीचे 🔥कार्य सुधारण्यासाठी आयुर्वेदिक औषधे, योग्य पथ्यापथ्य, योगा-व्यायाम, व गरजेनुसार पंचकर्म करून घ्यावीत.

🎯 योग्य #आहार - आपली स्वतःची एकदा कफ-पित्ताची म्हणजेच आम्लपित्ताची जन्म-प्रकृती आहे हे कन्फर्म झाले की त्यानुसार पथ्यापथ्य समजून घेतले पाहिजे.
✅ 👉🏻 भूक मंद असल्यामुळे यांनी नेहमी ताजे, गरम, मसालेयुक्त, पचायला हलके अन्नच खावे.

याविरुद्ध थंड, आंबट, आंबवलेले (इडली, डोसा इ.) अति गोड (गुळ साखर घातलेले) पदार्थ, शिळे अन्न, बिस्कीट इ. मैद्याचे बेकरी प्रोडक्टस खाणे टाळावे.❌🚫

✅ #सुंठ हे या लोकांसाठी खूप चांगले औषध आहे. सर्दी, खोकला, कफ, आम्लपित्त, उलटी, जुलाब, आव पडणे इ. तक्रारींमध्ये सुंठ पावडर मध किंवा गरम पाण्यासोबत घेतल्यास त्वरित चांगला आराम मिळतो. 👌👍

☕ गरम चहा, आलं टाकून पिल्यावर या लोकांना छान फ्रेश वाटते. पण अतिमात्रेत चहा झाल्यास आम्लपित्त, त्वचा विकार व जाडी देखील वाढते.
यासाठी या लोकांनी साधा चहा-कॉफी न घेता आयुर्वेदिक पद्धतीचा चहा प्यावा. 👍

☕ #आयुर्वेदिकचहा (काढा) -
रात्री झोपण्यापूर्वी 2 कप पाण्यात 4 खारका व मूठभर मनुका भिजत घालाव्यात. त्यात सकाळी आले / सुंठ, लवंग, वेलची, दालचिनी, तुळस, गवती चहा टाकून हा काढा उकळावा, निम्मा आटवावा. हा काढा गाळून घेऊन त्यातील खारीक मनुका चावून खाव्या व काढा चहासारखा प्यावा.

🎯 अवेळी, पोषण मूल्ये समजून न घेता आहार घेणे ही मुख्य चूक -
2 वेळचा गोड चहा, 2 वेळचा नाष्टा व 2 वेळचे घरचे जेवण इतके अन्न देखील या लोकांमध्ये अपचनास, वजन वाढीस कारणीभूत होते. 😨

यासोबत जर चहाचे प्रमाण वाढले, बाहेरचे चमचमीत पदार्थ खाणे झाले तर पचन आणखीनच बिघडते व वजन जास्तच वाढत जाते.

👉🏻 भूक कमी, अग्नी मंद असल्यामुळे या लोकांना वजन कमी करण्यासाठी दीक्षित डाएट प्रमाणे फक्त 2 वेळी पोटभर जेवण्याचा फॉर्म्युला योग्य लागू पडतो.
यांना मी साधा गोड चहा, नाष्टा बंद ठेऊन सकाळी आयुर्वेदिक चहा (काढा) पिणे व चांगली भूक लागली की 10 ते 11 चे दरम्यान पोटभर जेवण, व संध्याकाळी लवकर 8 वाजणेपूर्वी हलका आहार (फक्त शिजवलेले मूग / मुगाची खिचडी तूप टाकून) खायला सांगतो. या लोकांना खोटी भूक सारखी लागत असेल तर त्यांनी साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या फोडणी दिलेल्या खाव्या. गोड खायची इच्छा झाल्यास खारीक (Dates) खावी. हाडांच्या मजबुतीसाठी अंड्याचा पांढरा भाग, चणे-फुटाणे, तुपात भाजलेला डिंक+खारीक पावडर मिक्स करून खावी.

🎯 योग्य #व्यायाम -💪🏻 कफ प्रधान व्यक्तींमध्ये पचन सुधारण्यासाठी व वजन, चरबी कमी होण्यासाठी भरपूर व्यायाम करावा. सूर्यनमस्कार, जोर बैठका किंवा चांगल्या ट्रेनर च्या मार्गदर्शन खाली जिममध्ये सुद्धा 🏋🏻‍♀️ व्यायाम करून भरपूर घाम गाळायला हरकत नाही. फक्त या ट्रेनर कडून काहीही चुकीचा डाएट न घेता 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' कडून तुमच्या प्रकृतीला योग्य डाएट सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.

व्यायामानंतर भरपूर घाम येऊन त्या जागी त्वचेला फंगल इन्फेक्शन होण्याचा त्रास अनेकांना होतो, तो टाळण्यासाठी या लोकांनी व्यायामानंतर त्रिफळा चूर्ण किंवा उटणे लावून अंघोळ करावी व आंघोळीनंतर सुद्धा हे चूर्ण अंगाला कोरडे फासावे.

😇मनस्थिती स्वभाव स्थिर ठेवणे महत्वाचे.
या लोकांची चंचल, अस्थिर मनस्थिती, सतत विचार करणेचा स्वभाव अनेक आजारांना कारणीभूत असतो. त्यासाठी
📕 #डायरीलेखन (मनातले विचार, टेंशन्स, त्यावर सुचलेला मार्ग, नफा नुकसान, रोजचे वेळापत्रक, भविष्यातील प्लॅनिंग्ज इ. लिहावे)
🧘🏻🧘🏻‍♀️ #नामस्मरण, सोबत योगा, प्राणायाम, मेडिटेशन सारखे उपचार करणे देखील अतिआवश्यक ठरतात. 🧘🏻‍♀️🧘🏻‍♂️

तसे तर संपूर्ण निरोगीपणाचे वरदान कोणालाच मिळालेले नाही❗
पण जर आपण स्वतःची जन्म-प्रकृती म्हणजेच शरीर व मनाला नीट समजून घेतले तर मोठ्या आजारपणांपासून नक्कीच स्वतःचा बचाव करू शकतो, हे महत्वाचे लक्षात ठेवा.

आणखी एक महत्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवा... 👨🏻‍⚕️ डॉक्टर हा फक्त उत्तम मार्गदर्शक असतो व औषधे मदतीला... बाकी 'तुमचं शरीर स्वतःच स्वत:ला बरं करत असतं❗'

“ #तूच_आहेस_तुझ्या_जीवनाचा_शिल्पकार❗” - सदगुरू 🙏🏻

तसं तरं बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण शब्दांच्या मर्यादा लक्षात घेऊन आवरतं घेतो.

मला आशा आहे कि या माहितीमुळे आता तुम्ही योग्य ती काळजी घ्याल व आजच्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या सर्व शुभेच्छा (शुभ-इच्छा) सार्थकी लागतील❗

तुमच्या कोणत्याही आरोग्याच्या तक्रारींवर मार्गदर्शनासाठी तुमचा हा ‘आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर’ तुमच्या सोबत नेहमी आहेच, आवश्यकतेनुसार जरूर संपर्क करा.
धन्यवाद 🙏🏻

आपलाच
‘आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर’
डॉ.उदय पाटील
।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।।
फॅमिली हेल्थ क्लिनिक व पंचकर्म सेंटर
कोरेगाव & सातारा
फोन - 88884 98732 & 82087 13119

यासारखी आयुर्वेदिक आरोग्यदायी माहिती नियमित मिळवण्यासाठी वरील फोन नं. वर मेसेज करा - "आयुर्वेद फॅमिली मध्ये ऍड करा❗"

Address

Shree Shraddha Ayurved, Above Buladhana Urban Co. Op. Bank, Bajarpeth Road, Azad Chowk
Koregaon
415501

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+918208713119

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ।। Shree Shraddha Ayurved ।। posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ।। Shree Shraddha Ayurved ।।:

Share