01/04/2026
किडनीचे आजार एकदा झाल्यावर बरे होत नाहीत का?
एकदा डायलिसिस सुरू केल्यानंतर ते आयुष्यभर करावे लागते का?
जनसामान्यात असणारी ही भीती स्वाभाविक आहे. असाच एक प्रश्न घेऊन आमच्याकडे एक रुग्ण आले होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास, उलटी, मळमळ, अंगावर सूज अशी लक्षणे होती. रक्तातील क्रिएटिनचे प्रमाण वाढलेले होते (११ mg/dl).
त्यांना सर्व मुद्दे समजावून सांगितले. डायलिसिसची गरज समजावून सांगितली. किडनीचा विकार हा तात्पुरता असून डायलिसिस सुद्धा तात्पुरते आहे, हे स्पष्ट केले. पेशंट व कुटुंबीयांनी विश्वास दाखवला. योग्य उपचार करण्यात आले. फक्त तीन वेळा डायलिसिस करण्यात आले.
किडनीचा आजार संपूर्ण बरा झाला. रक्तातील क्रिएटिनचे प्रमाण अकरा वरून चारवर आले. डायलिसिस सुद्धा बंद झाले.
किडनी आजाराचे वेळेत निदान करून योग्य उपचार केले तर किडनीचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.
हॅपी पेशंट …. हॅपी डॉक्टर….
डॉ. अजित घोडके
किडनी तज्ज्ञ (Kidney Specialist)
MEDICARE SUPERSPECIALITY HOSPITAL
BEED.