19/06/2026
आदिवासी, ग्रामीण आणि दुर्गम भागांच्या सर्वांगीण विकासासाठी आज महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल मा श्री Jishnu Dev Varma जीं यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय संकुल विकास परियोजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून आदिवासी भागांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
मा. पंतप्रधान श्री Narendra Modi जीं यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत’ संकल्पनेला आणि मा. मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जीं यांच्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेला गती देत ग्रामीण व आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडत महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला गती देणारा हा उपक्रम ठरणार आहे.
यावेळी माननीय श्री.व्ही. सतिशजीं,खा.डॉ. हेमंत सवरा, डॉ. गजाननजी डांगे, माजी खा. हिनाताई गावीत, डॉ. देवरावजी होळी, रवीजी अनासपुरे तसेच सेंवावर्धिनी टीम, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.